Ad will apear here
Next
‘मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पुढाकार घ्या’
पुणे : ‘मुलांमध्ये साहित्याची आवड आणि वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेने शाळांना आणि पालकांना केले आहे.

परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मुलांच्या गतिमान जीवनशैलीत खेळाला आणि अवांतर वाचनाला अजिबात स्थान नाही. या मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शाळांनी आणि पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. साहित्य परिषदेतर्फे सर्वतोपरी मदत यासाठी केली जाईल.’
 
त्यासाठी शाळांनी शाळा सुरू होण्यापूर्वीची राष्ट्रगीतानंतरची दहा मिनिटे या उपक्रमासाठी द्यावी. या दहा मिनिटांत दररोज शिक्षकांनी मुलांना एक कविता, एक कथा, पुस्तकातील काही भाग किंवा मान्यवर लेखकाचे जीवनचरित्र वाचून दाखवावे. शाळेतील एखादे शिक्षक रजेवर असतील, तर त्यांच्या तासाला जाणाऱ्या शिक्षकांनी वर्गात पुस्तकांची पेटी घेऊन जावी. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी द्यावे. मुलांनी काय वाचले हे लिहिण्यासाठी त्यांना स्वतंत्र वही करायला सांगून त्यात त्या पुस्तकाविषयी लिहायला सांगावे. उत्तम नोंदी ठेवणाऱ्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. दर तीन किंवा सहा महिन्यांनी या बालवाचकांचे वाचक संमेलन घ्यावे. दर वर्षी शाळेत स्नेसंमेलनाला जोडून विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घ्यावे. मुलांना शाळेतर्फे जी पारितोषिके दिली जातात ती ग्रंथरूपात द्यावीत.

शाळेबरोबरच पालकांचाही यात सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी सोसायटीत मुलांसाठी वाचक पेट्या असाव्यात, असा आग्रह सोसायट्यांकडे धरावा. वर्षात मुलांच्या आवडीची २० पुस्तके खरेदी करावीत. आठवड्यातून किमान एक तास पालकांनी मुलांबरोबर सहवाचन करावे. समवयस्क मित्राच्या वाढदिवसाला ग्रंथ भेटच देण्याचा आग्रह धरावा. सोसायटीतल्या मुलांची वाचकभिशी करून त्यात त्यांना वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलायला सांगा. जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या मुलांना वैयक्तिक आणि सोसायटीतर्फे पारितोषिक द्यावीत.

या बालवाचकांसाठी मराठी साहित्य परिषदेतर्फे मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत याची यादी उपलब्ध करून दिली जाईल. शाळांमध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम राबविण्यासाठी मदत करेल. बाल वाचक संमेलन आणि स्नेहसंमेलनांना जोडून मुलांसाठी साहित्य संमेलन घेण्यासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी बालवाचक पालकत्व योजना राबविण्यासाठी मदत करेल. प्रत्येक शाळेतील शाळेने नोंद ठेऊन शिफारस केलेल्या विद्यार्थी वाचकांना ‘उत्तम वाचक’ म्हणून प्रमाणपत्र देईल. मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांचा आणि सोसायट्यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. अशा शाळांना ग्रंथाच्या रूपाने मदत करण्यात येईल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZSEBP
Similar Posts
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कवयित्री आश्लेषा महाजन आणि मीरा शिंदे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार दि. ३० जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘मनोविकास प्रकाशना’ला पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दर वर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ पुरस्कृत कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी मनोविकास प्रकाशनच्या ‘ऐवजी’ (नंदा खरे) या ग्रंथाची निवड केली आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language